कोल्हापूर | २५ जून २०२५ – कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जून २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, ताराबाई पार्क येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये:
- दिनांक: २७ जून २०२५ (गुरुवार)
- वेळ: सकाळी १० ते दुपारी ४
- स्थळ: डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, ताराबाई पार्क, कोल्हापूर
- रिक्त पदे: १,४७०
- उद्योग: २८ नामांकित खाजगी उद्योगांचा सहभाग
उपलब्ध पदे व पात्रता:
ITI पात्रतेसाठी (एकूण 826 पदे)
- CNC, VMC ऑपरेटर
- मशिनिस्ट, वेल्डर
- इलेक्ट्रिशियन इ.
अभियांत्रिकी/डिप्लोमा पात्रतेसाठी (82 पदे)
- जॉब इन्स्पेक्टर
- मॅन्टेन्स
- सुपरवायझर
पदवीधारकांसाठी (89 पदे)
- सेल्स एक्झिक्युटिव्ह
- लेखापाल
- प्रोडक्शन सुपरवायझर
8वी/10वी/12वी उत्तीर्णांसाठी (473 पदे)
- हेल्पर
- शिफ्ट सुपरवायझर
- असिस्टंट स्टाफ
नोंदणी कशी कराल?
- उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी.
- QR कोड स्कॅन करून देखील नोंदणी करता येईल.
- मुलाखतीसाठी येताना शैक्षणिक प्रमाणपत्रांची प्रत, ओळखपत्र, बायोडाटाच्या ५ प्रती सोबत आणाव्यात.
- स्कॅन QR Code
पालकमंत्र्यांचे आवाहन
कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आवाहन केले आहे की,
"ही संधी कोल्हापूरातील तरुणांसाठी उज्ज्वल भविष्यातील पाऊल ठरू शकते. जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे."
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हे केवळ एक रोजगार संमेलन नसून, कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाईला आर्थिक स्वावलंबनाकडे नेणारे व्यासपीठ ठरत आहे. तुमच्याकडे योग्य पात्रता आहे का? तर ही संधी दवडू नका – रोजगाराच्या वाटेवरचा हा महत्त्वाचा टप्पा तुमच्याचसाठी!