भाज्यांचा पुरवठा ठप्प:
APMC बाजारपेठेत पुरवठा न झाल्याने भाज्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सरासरी दर ₹40 ते ₹50 प्रति किलोपर्यंत वाढल्याने सामान्य ग्राहकांचे बजेट बिघडले आहे.
दूध संकलन घटले:
गोकुळ डेअरीसारख्या प्रमुख दूध संघटनांमध्ये दररोज जवळपास १०,००० लिटर दूध संकलन घटले आहे. यामुळे दुधाचा पुरवठा देखील धोक्यात आला असून दुधाच्या दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान:
पूरामुळे शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांचे नुकसान, पुरवठा खंडित होणे आणि वाहतूक बंद झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
प्रशासन सज्ज:
स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. काही भागात मदत केंद्र उभारण्यात आली असून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.

