जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री दत्तक्षेत्र नृसिंहवाडी येथे, यंदाच्या वर्षीचा तिसऱ्यांदा दक्षिण द्वार सोहळा, काल पहाटे ५.०० वाजता संपन्न झाला. गेले काही दिवस कोयना धरणाच्या व चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असल्याने, कोयना धरणातून व चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने यंदाच्या वर्षीचा तिसरा दक्षिणद्वार सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे संपन्न झाला. महाराष्ट्रात सांगली ,सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने तसेच कोयना व चांदोली व राधानगरी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू असल्याने ,वरील धरणांच्या मधून पाण्याचा विसर्ग करणे क्रमप्राप्त